Bharat Samaj Aani Rajkaran
Regular price
₹ 727
Sale price
₹ 727
Regular price
₹ 750
Unit price
Save 3%
Item Weight | 700 Grams |
ISBN | 978-93-89458-08-4 |
Author | Dr. Jayant Lele |
Language | Marathi |
Publisher | Rohan Prakashan |
Pages | NA |
Edition | 1st |

Bharat Samaj Aani Rajkaran
Product description
Shipping & Return
Offers & Coupons
भारत : समाज आणि राजकारण₹. यशवंतराव चव्हाण यांचे प्रगट चिंतन डॉ. जयंत लेले डॉ. जयंत लेले हे कॅनडातील किंग्स्ट्न येथील क्वीन्स विद्यापीठातील राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि जागतिक विकास ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले असून आता ते तिथेच सन्माननीय प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. जयंत लेले हे ‘शास्त्री इंडोकॅनेडिअन इन्स्टिट्यूट’चे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष होते. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि आर्थिक प्रश्नांवर बरंच लिखाण केलं आहे. भारत आणि दक्षिणपूर्ण आशियावरच्या अनेक पुस्तकांचे ते लेखक आणि संपादक आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय विकासावरची त्यांची पुस्तके आणि लेख अनेक विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून वापरली जातात. अनुवाद: माधवी जी.आर. कामत आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल. स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल. भारत : समाज आणि राजकारण ? , . :डॉ. जयंत लेले, माधवी जी.आर. कामत :---- : : चरित्र-आत्मचरित्र, टॉप दसरा-दिवाळी-योजना, राजकीय , , अनुभवपर, चरित्र, मुलाखत, राजकीय, लोकशाही, सामाजिक
- Sabr– Your order is usually dispatched within 24 hours of placing the order.
- Raftaar– We offer express delivery, typically arriving in 2-5 days. Please keep your phone reachable.
- Sukoon– Easy returns and replacements within 7 days.
- Dastoor– COD and shipping charges may apply to certain items.
Use code FIRSTORDER to get 5% off your first order.
You can also Earn up to 10% Cashback with POP Coins and redeem it in your future orders.